मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २३, २४ जून रोजी पुणे येथे होणारे राष्ट्रीय संमेलन रद्द करण्यात आले आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
१० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल सांगता सभा पुणे येथे मोठया उत्साहात पार पडली; मात्र राष्ट्रीय सरचिटणीस टी. पी. पिंताबरम यांनी हे संमेलन रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. काही दिवसांतच या संमेलनाचे ठिकाण जाहीर करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. उर्वरित लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. नावे जाहीर करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांमध्ये बाबाजी जाधव (रत्नागिरी), प्रमोद घोसाळकर (रायगड), अनंत सुतार (नवी मुंबई), प्रकाश दुबोले (मिरा-भाईंदर), सुनील भुसारा (पालघर), प्रदीप गारटकर (पुणे ग्रामीण), सुनील माने (सातारा), विलासराव शिंदे (सांगली ग्रामीण), दीपक ऊर्फ आबा सांळुखे-पाटील (सोलापूर ग्रामीण), मनोज मोरे (धुळे शहर), किरण शिंदे (धुळे ग्रामीण), राजेंद्र गावित (नंदुरबार), डॉ. निसार देशमुख (जालना), आमदार राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद), मकरंद सावे (लातूर शहर), बाबासाहेब पाटील (लातूर ग्रामीण), अॅड. नाझीर काझी (बुलढाणा), राजकुमार मुलचंदानी (अकोला शहर), राजेंद्र महल्ले (अमरावती शहर), सुनील वऱ्हाडे (अमरावती ग्रामीण), नील राऊत (वर्धा), अनिल अहिरकर (नागपूर शहर), नाना पंचबुद्धे (भंडारा), पंचम बिसेन (गोंदिया).
या पत्रकार परिषदेला पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, आमदार विद्या चव्हाण उपस्थित होते.